रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
श्री ज्ञान भास्कर सेवा समिती अकोला च्या वतीने गत २३ वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीचा पर्यटनाच्या माध्यमातून परिपूर्ण आनंद घेण्याच्या दृष्टीने तीर्थक्षेत्राच्या यात्रेचे आयोजन केल्या जाते , सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा माता वैष्णो देवी तीर्थयात्रेचे दिनांक २३l ५ते १l७ l२०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले होते तसेच ते निर्विघ्न व यथाविधी संपन्न झाले
यावर्षी यात्रेचा शुभारंभ दिनांक २३ l ५ ला अकोला येथून झाला त्यामध्ये शेगाव , अकोला , बडनेरा , अमरावती , नागपूर , चंद्रपूर आधी ठिकाणावरून तब्बल १७५ यात्रेकर सहभागी झाले होते त्यात प्रथम २४ आणि २५ तारखेला संपूर्ण दिल्ली दर्शन त्यामधे कुतुब मिनार , राष्ट्रपती व जुने आणि नविन संसद भवन , कर्तव्य पथ , राजघाट , लोटस टेम्पल , बिर्ला मंदिर आदी पर्यटन स्थळाला भेटी देल्या. तदनंतर महाभारताची युद्ध स्थळ कुरुक्षेत्र या ठिकाणी समग्र गीता पारायण आणि श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मुखारबिंदातून स्थान महात्म्य व संपू