शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : श्री शिवराज्याभिषेक ३५० सोहळा समिती व विश्ववंदे शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज उमरखेड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदे मध्ये ह्या अभियानाचे संयोजक गजानन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा हा ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके १९४५ वार शुक्रवार २ जुण २०२३ पासून सुरू होत आहे . त्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन संचालन समिती व प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले . मागील तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उमरखेड, महागाव तालुक्यातील परिसरात तरुणांच्या साथीने आम्ही घेत असतो व यावर्षी महाराजांच्या ३५० व राज्याभिषेक वर्ष सुरू झाल्यामुळे शासण स्तरावरही कार्यक्रम होणार आहेत . आपणही आपल्या उमरखेड महागांव ढाणकी परिसरात हा सोहळा व्यापक स्वरूपात घेण्याचे ठरविले . उपक्रमांतर्गत दुर्गराज रायगड वरील पवित्र माती कलश यात्रा २ जून २०२३ पासून माता रेणुका मंदिर मुळावा येथून सुरू होणारी रथ यात्रा उमरखेड , ढानकी, महागाव परिसरातील गावो गावी फिरून शेवटी ११ जून २०२३ ला सकाळी ७ ते ९ उमरखेड शहरात शोभायात्रा निघेल व त्या नंतर जाहीर व्याखानाने यात्रेचा समारोप होईल . दुर्गराज रायगडची पवित्र माती सरपंच , ग्राम प्रमुख व ग्राम समितीला देऊन त्या माती मध्ये गांवा गांवा मध्ये वृक्षारोपण होणार आहे . या उपक्रमासाठी शिवप्रेमी जनतेने, नागरिक, माता भगिनींनी तन-मन धनाने सहकार्य करावे शोभा यात्रेच स्वागत कराव तसेच गावागावात ही यात्रा येईल त्या यात्रेमध्ये सहभागी व्हाव व समारोपीय कार्यक्रमांमध्ये ११ जुण २०२३ ला आवर्जून याव अस आव्हान समिती तर्फे करण्यात आले . तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० व राज्याभिषेक वर्ष हे श्री शिवराज्याभिषेक सोहळा ३५० साजरा करण्यात येणार असून या वर्षभरात विविध उपक्रमांचा आयोजन करण्यात येणार आहे त्यातही सहभागी व्हाव आशी विनंती आव्हान समितीच्या वतीने करण्यात आली आहे . श्री शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण व्हावा आशी मागणी ही आम्ही शासन स्तरावर करणार असल्याचे गजानन शिंदे म्हणाले . ह्या वेळी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाची उतरेही समिती सदस्यानी दिली . यावेळी पत्रकार परिषदेत अभियान संयोजक गजानन शिंदे , अँड विलासराव देवसरकर , देवहारी पवार , अजय बेदरकर , प्रशांत जाधव सर , प्रवीण फुलारी , सुधाकर लोमटे , रामचंद्र वानखेडे सर , अनिरुद्ध मुक्कावार , रितेश कदम , आशिष विश्वंभरे ,विष्णू वानखेडे , अनिल जाधव उपस्थित होते.