बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : ग्रामीण भागामधील ग्रामसेवक, तलाठी,कृषी अधिकारी, बी डी ओ, तहसीलदार, सी ई ओ, पी आय, कलेक्टर,एस पी असे अधिकारी यांचे सहित इतर सर्व विभागातील कर्मचारी यांना ऑफिसमध्ये सलग तीन दिवस सोमवार, मंगळवार,बुधवार या दिवशी पूर्ण वेळ जनतेच्या कामासाठी ऑफिसमध्ये उपस्थित रहावे व इतर गुरुवार, शुक्रवार शनिवार या दिवशी संबंधित ऑफिस संदर्भातील मीटिंग बैठकीसाठी राखीव करण्यात यावे.अशा प्रकारे कामाचे वार व मीटिंगचे वार शासकीय पातळीवर निश्चित करण्यात यावेत.अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष भानुदास शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे केली आहे.कारण अनेक वेळा वरील सर्व अधिकारी व कर्मचारी कधीही मीटिंगसाठी जातात त्यामुळे लांबून गावागावातून वेगवेगळ्या ऑफिसमध्ये कामासाठी आलेल्या जनतेची कामे होत नाहीत.तसेच अनेक अधिकारी विनाकारण मीटिंग चे नाव सांगून ऑफिसमध्ये उपस्थित राहत नाहीत. असेही दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक वेळा शासकीय कामासाठी ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागतात व त्यांना मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड बसतो व वेळेचाही अपव्यय होतो. जनता व अधिकारी यांच्यामध्ये कामासाठीचा सुरळीतपणा आणण्यासाठी आठवड्याचे पहिले तीन दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार असे सलग पूर्ण वेळ अधिकारी व कर्मचारी जनतेच्या कामासाठी ऑफिसमध्येच उपस्थित असावेत व उर्वरित गुरुवार,शुक्रवार शनिवार अशा तीन दिवसात मीटिंग बैठका ठेवण्याचे निश्चित करण्यात यावे. यामुळे सर्वांनाच कामासाठी सुरळीत पणा तयार होईल व नागरिकांची गैरसोय होणार नाही. तसेच अधिकारी वर्गालाही कामात सुरळीतपणा येईल.कृपया या महत्त्वपूर्ण मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा व त्वरित अंमलबजावणी व्हावी ही विनंती.सदर लोकाभिमुख मागणीची पूर्तता न झाल्यास रयत क्रांती पक्षातर्फे अचानक लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल.असा ईशारा त्यांनी शेवटी दिला आहे.