पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसला असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सालोड या गावी गेल्या २ दिवस सतत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला असून सर्व ग्रामस्थ पुन्हा अडचणी आले आहे.कारण हा नाला मुख्य वाहतूक रोड वर असून बाजार पेठ असलेले अकोला बाजार या गावी जाण्याचा एकमेव मार्ग आहे.तसेच दवाखान्यात जायचे असल्यास हाच नाला ओलांडून जावा लागतो.गर्वधर महिलांना दवाखान्यात जायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो.दर वर्षी कितेक जनावरे या नाल्यात वाहून गेले परंतु या कडे दुर्लक्ष होत आहे.मजूर वर्ग शेतकरी,शेतमजूर आधी लोकांना आपला जीव मुठीत घेऊन हा नाला ओलांडून जावे लागत आहे.या नाल्या ची दुरवस्था अतिशय खराब असून हा नाला बांधण्यात यावा या साठी सालोड या ग्रामस्थांनी गेले कित्येक वेळा ग्रामपंचायत,तसेच प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन दिले मात्र या कडे कोणीच लक्ष दिले नाही. दैनिक अधिकार नामा च्या वार्ताहर शी बोलताना ग्रामस्थांनी आरोप करत ग्रामपंचायत च्या उदासीनतेमुळे हा नाला अजून बांधण्यात आला नाही असे सांगितले.एखादा जीव जाईल तेव्हा प्रशासनाला जाग येईल का? हा प्रश्न आता ग्रामस्थांनी केला.पावसाळा मध्ये तर रोज या गावातील लोकांना हा नाला ओलांडून जीव धोक्यात टाकून जावं लागते. अशातच आता ही समस्या कधी मिटेल याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.