शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरिब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहु नये यासाठी राज्य शासनाने माध्यमीक विद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे केन्द्रे सुरु केले होते. ही केन्द्रे मागील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात आल्याने हजारों गरजू विद्यार्थी शिक्षणापासून दुर गेल्याने हि केन्द्रे पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी जीजाऊ ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष सरोज देशमुख यांनी
संस्थाचालक महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे . महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनी हे मुक्त विद्यापीठ केन्द्रातून शिक्षण घेतात त्यामुळेे उच्च माध्यमिक विद्यालयात मुक्त विद्यापिठाच्याया केन्द्राअंतर्गत हजारों विद्यार्थी -विद्यार्थीनींनीीी प्रवेश घेतला होता . अचानक हि केन्द्रे बंद केल्याने महाराष्ट्रातील भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांना त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे . यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने उच्च माध्यमिक विद्यालयाला दिलेले सर्व महाराष्ट्रातील केंद्र काढून घेतले महाराष्ट्रातील भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांना त्या मुळे नुकसान सहन करावे लागत आहे संस्थाचालक महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यानि ते केंद्रे पुन्हा सुरु व्हावेत यासाठी प्रयत्न करावा यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आवाहन सरोज देशमुख यांंनी केले . खा . सुप्रिया सुळेे यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिन्देे यांना भेटून ग्रामीण भागातील हजारों गरिबविद्याार्थ्यIचा प्रश्न माार्गी लावु असेेेे आश्वासन दिल्याने परत माध्यमिक विद्यालयात विद्यापिठाचे केन्द्रे राज्यभरात
सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.