अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा. रवि वैद्य हे असून यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मा. निलेश किरतकार यांच्या सूचनेनुसार पातूर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम पातूर तालुका महिला आघाडी तर्फे साजरा करण्यात आला.गेली दोन वर्ष कोरोणा काळामध्ये पोलीस बांधव आपल्या कर्तव्यावर कर्तव्यदक्ष होते.यामुळे रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करता आला नाही कोरोनामुळे अतिशय चांगली कर्तबगार ड्युटी बजावली व यावर्षी करोना हे संकट दूर झालेले आहे. रक्षाबंधन सर्वत्र ठिकाणी हर्षउल्हासामध्ये साजरा करण्यात आले.पातूर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार नाफडे, उपनिरीक्षक मा. हर्षल रत्नपारखी, माजीद पठाण (एल.सी.बी, अकोला) तसेच कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाऊन पोलीस बांधवांना राखी बाधुन रक्षाबंधन साजरे केले.पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी बद्दल विचारपूस केली. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा.रवी वैद्य यांनी शासन दरबारी केलेल्या सतत प्रयत्नामूळे पोलीस भरतीमध्ये पोलीसांच्या पाल्यांना पाच टक्के आरक्षण मिळाले आहे. तसेच मैदानी धावण्याच्या चाचणीमध्ये पूर्वी जो वेळ भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दिला होता त्यामध्ये 50 सेकंदाचा अधिकचा वेळ वाढवुन मिळाला.पोलीसांच्या न्याय,हक्कासाठी झटणारी व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढा देणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संघटना आहे. पातूर तालुका महिला आघाडी तर्फे संपूर्ण रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश पोहरे,सचिव कु. कोमल सुरवाडे, सहसचिव सतिश कांबळे, तुषार शेवलकार, अविनाश गवई, पवन सुरवाडे, राहूल वाघमारे, अतुल भांगे, सै.तौसिफ़ इत्यादी उपस्थित पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.