वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील येवती येथे दि. 9 ,तारकेला दुपारी दोन वाजेपासुन पावसाने सुरवात केली आणि पावसाने खुप रूद्र रूप धारण केले. आजपर्यंत जवळपास विस वर्षात येवती येथे पुर आला नाही तेवढा दि.आज 9 तारखेला भयानक पुरस्थिथी निर्माण झाली. येवती येथे अनेक लोकांच्या शेतात पूर गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले , शेतातील पीक पाण्यामुळे खरंडुन गेली आहे . येवती येथे आज पर्यंत विस वर्षात कधी पुर आला नाही तेवढा यावर्षी दि. 9 तारखेला पुर आला आहे .तरी येवती येथे पुरपरीस्थीतीची पाहणी करून वरीष्ठ अधिकारी यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यांना आर्थीक मदत जाहिर करावी अशी जनतेची मागणी आहे.