अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव : विज्ञानवादी युगात देशाच्या पाठीवर भारत आणि पाकिस्तान दोन देश जातीपातीच्या राजकारणपायी मागे आहेत.त्यामुळे देशाचे राजकारण जातीपातीवर न करता विकासावर केल्यास देश महासत्ता होईल असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.ते मेडशी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.मेडशी ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने भास्करराव पेरे पाटील यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती शेख गणीभाई हाजी शेख चाँदभाई यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मीताई प्रदीप तायडे,पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई रामभाऊ साठे,सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई,गट विकास अधिकारी विलास खिल्लारे,विस्तार अधिकारी लोखंडे, शिवसेना उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर मुंढे,माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप भास्कर तायडे,माजी पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे पाटील,माजी सरपंच रमजान गौरे,माजी सरपंच बबनराव मिटकरी आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा आणि माजी राष्ट्रपती ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार सरपंच शेख जमीरभाई ,ग्राम पंचायत सदस्य मुलचंद चव्हाण,अमोल तायडे,कैलास ढाले,गजानन झाटे,सौ.संध्याताई भगवान मेडशीकर,सौ शांताबाई प्रकाश तायडे,सौ पूजा जगदीश राठोड,मिराताई ज्ञानेश्वर मुंढे आदींच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.पेरे पाटील बोलताना पुढे म्हणाले की,प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती असतात. त्यामधे निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आघाडीवर असतात.अशा प्रवृत्ती दुर्लक्षीत करूनच विकास साधला पाहिजेत.सरपंच आई आहे तर ग्रामसेवक कल्पतरू आहे.त्यांना त्रास न देता ग्राम विकासाचे लक्ष्य साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पेरे पाटील यांनी आपल्या विनोदी भाषण शैलीतून चौफेर परखड मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद ज्ञानदेव तायडे यांनी केले.तर सूत्रसंचालन शेख जावेद यांनी केले.आभार सुभाष यशवंत तायडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्राम पंचायत कर्मचारी शेख जावेद,बाळू घुगे,मुकेश चव्हाण,दत्ता काळे आदींनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला परिसरातील सरपंच,उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य,बचत गटाच्या महिलासह मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होते.भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते माजी सभापती शेख गणीभाई हाजी शेख चाँदभाई,जिल्हा परिषद सदस्या सौ.लक्ष्मीताई प्रदीप तायडे,पंचायत समिती सदस्या, कौशल्याबाई रामभाऊ साठे तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण,पोलिस पाटील अनिताताई चोथमल आदी मान्यवरांचा पोलिस माझाच्या वतीने शाल.पुष्पगुच्छ,स्मृतिचिन्ह देवून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यात आला.