वैनगंगा नदी पुलीयावर कठडे लावण्याची मागणी.
सात दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची अजूनही दखल नाही.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आरमोरी:-वैनगंगा नदिवरील पुलावर कठडे लावण्यास प्रशासन डोळेझाक करीत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.8 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहेत.नागपुर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीला 2020 ला पूरपरिस्थिती आल्याने या नदीवरील कठडे पुराच्या पाणीप्रवाहात वाहून गेलं याबाबत जिल्हाधिकारी,राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचेकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील या प्रकरणाकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.वैनगंगा नदी पुलावरून नागपुर- चंद्रपूर – गडचिरोली जिल्हातील लोकाचा मोठ्या प्रमाणात आवागमण सुरु असते.या पुलावर अपघात होवून एका युवकाचा नदीत पडून मृत्यू झाले होते.तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करित आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधण्याकरिता आरमोरी येथील लोकहित संघर्ष समितीने दि.2 फरवरी पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरवात केली.या धरणे आंदोलनाला राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या प्रतिनिधीने भेट देवून उडवा उडवीचे उत्तरे दिली.त्यामुळे आंदोलकाचे समाधान झाले नाही.राष्ट्रीय महामार्ग वित्रागाची उदासिनता बघुन त्यांना याविषयीचे गांभीर्याने दखल घेण्याकरीता दि .8 फरवरी रोजी नागपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर लोकहित संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेत निखिल धार्मिक प्रकार जनशकी पक्ष गडचिरोली,राहुल जुआरे अध्यक्ष युवारंग,रंजित बनकर मनसे जिला उपाध्यक्ष,महेंद्र शेंडे शिवसेना तालुका अध्यक्ष,अमोल मारकवार माकपा जिल्हा सचिव,देवानंद दुमाने अध्यक्ष वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था,संजय वाकडे भाकपा शहर सचिव आरमोरी,प्रफुल खापरे,शाबीर शेख,राकेश सोनकुसरे,अंकुश गाढवे,रिंकू झरकर,अक्षय भोयर,विनोद निमजे,सारंग जांभुळे, प्रथमेश साळवे,अक्षय बोरकर,उमेश पिंपळकर,अरविंद धकाते,अनंता भोयर,मनोज गेडाम,महादेव कोपुलवर,श्रीराम ठाकरे,प्रशांत सोरते,अभिषेक जुआरे,अंकुश दुमाणे,दीपक सोनकुसरे व पदाधिकारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.