किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : कर्मनिष्ठ, जबाबदार,शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, अभ्यासू ,स्वतःला नेहमी अपडेट ठेवणारे, मेहनती, वेळेचा सदुपयोग करणारे, पारदर्शी कारभार पाहणारे, मुख्याध्यापक आणि त्याहूनही एक सच्चा मित्र म्हणून बी एम वानखडे सर हे नेहमी संस्थेच्या स्मरणात राहतील”, असे गौरवोद्गार बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक, माजी प्राचार्य विजयसिंहजी गहिलोत सर यांनी वानखडे सरांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात काढले.तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संचालक बी.एम. वानखडे सर यांच्या सेवानिवृत्तीपर सपत्निक सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर अध्यक्षा म्हणून संस्थेच्या सचिव सौ स्नेहप्रभादेवी गहिलोत,प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य एस बी ठाकरे सर ,सौ सुरेखा वानखडे मॅडम इ. उपस्थित होते. यावेळी शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन मुख्याध्यापक बी.एम. वानखडे सरांचा संस्थेच्या वतीने गहीलोत सर व मॅडम यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी श्री अविनाश आगासे मदर इंडिया कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका उंबरकर मॅडम यांनी सुद्धा बी.एम. वानखडे सरांचा सपत्नीक सत्कार केला. संस्थेत सेवा देत असतांना मी काय कमावले व काय गमावले यावर बी.एम.वानखडे सरांनी सत्काराला उत्तर देताना सविस्तर प्रकाश टाकला. बी.एम. वानखडे सरांनी सत्य आणि नैतिकतेने आपले पद सांभाळले त्यासोबतच व्यक्ती किती बोलतो यापेक्षा तो किती काम करतो याचा दंडक बी.एम.वानखडे सर यांनी घालून दिला”, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सचिव सौ.स्नेहप्रभादेवी गहिलोत मॅडम यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी. ठाकरे सर यांनी तर सूत्रसंचालन सुभाष इंगळे यांनी केले.उपस्थितांचे आभार एस.आर.खाडे यांनी मानले. यावेळी अविनाश आगाशे,वैभव वानखडे,योगेश वानखडे,अंशुमानसिंह गहिलोत सर,जगमोहनसिंह गहिलोत सर तसेच तुळसाबाई कावल विद्यालय बाभुळगाव व पातुर येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते