रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची मागणी
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर तालुक्यातील ग्राम दुधानी हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसले असून गावापासून काही अंतरावर नदी आहे व याठिकाणी विविध शहरातील लोक पर्यटनाच्या नावाखाली फिरण्यासाठी नेहमी ये जा करतात.परंतु नदीला मोठ्या प्रमाणात पाणी चालू असून स्त्री व पुरुष वाहत्या पाण्यात अंघोळ करण्याकरिता जातात.त्यामध्ये पोहणे नसल्यामुळे व सदर ठिकाणी शासनाचे कुठलेच निर्बंध नसल्यामुळे बऱ्याच नागरिकांची जीवित हानी झाली आहे व यापुढेही पाण्यामध्ये बुडून मरण पावण्याची श्यक्यता नाकारता येत नाही व सदर ठिकाणी कडक निर्बंध घालून दुधानी परिसर हि पर्यटकांच्या जीवसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी.अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला ह्यांनी सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी पातूर तालुका चे तहसीलदार दीपक बाजड व ठाणेदार हरिष गवळी ह्यांना निवेदनाद्वारे केली ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष सागर इंगळे,सुरेंद्र अवचार,वैभव अवचार,बंटी अवचार,आदित्य अवचार आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली.