अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मेडशी मंडळामध्ये मागील आठ ते दहा दिवस पासून अतिवृष्टी होत असून पावसाने धुमाकूळ घातला आहे.शेतकऱ्याच्या शेतातील काढणीला आलेले सोयाबिन पिकाची दयनीय अवस्था झाली आहे.कोणाचे उभे पिकाला कोंब फुटले तर कोणाच्या सुडीत पाणी घुसले तर कोणाच्या सोंगुन पडलेल्या सोयाबिन पिकाच्या मुठीला जागीच कोंब आले असून सदर पिकाची नासाडी झाली.काही शेतात पिकाच्या वाढीच्या पेक्षा जास्त पाणी साचले व संपूर्ण पीक पाण्यात दुबून सडून गेले.त्यामुळे तेथे तर नुकसानीची परिसीमेला मर्यादाच नाही राहिली.अश्या भीषण नैसर्गिक आपत्तीत मेडशी मंडळामधील शेतकरी आज आला आहे.त्याला कवच म्हणून मंडळा मधील काही शेतकरी वर्गाने पीक विमा काढलेला आहे व सदर पीक विमा कंपनीच्या नियमाअंतर्गत झालेल्या नुकसानीचे बाहत्तर तासाच्या आत ऑनलाईन तक्रार केली याची दखल घेत विमा कंपनी चे प्रतिनिधी यानी थेट शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करण्यास आज पासून युदधपातळीवर सुरवात केली.सोयाबिन पिकाची झालेली वाईट अवस्था पाहून मेडशी मधील सरपंच शेख जमीर यानी थेट शेताच्या बांधावरून आमदार अमित झनक यांच्याशी चर्चा केली व शेतकऱ्याला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्याकरिता सरकार कडून शक्य होईल ती मदत करण्याची विनंती केली.ज्यांनी ऑनलाइन तक्रार केली नाही अशा सर्वांनी दिनांक नऊ ऑक्टेंबर ला ठीक नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालय मेडशी येथे उपस्थित रहावे असे आवाहन कृषी सहायक विलास ढवळे यांनी केले.या प्रसंगी उपस्थीत विमा कंपणीचे प्रतिनिधि तसेच मेडशी सरपंच शेख जमीर, तलाठी दत्तराव घुगे गजानन बानाईत, कोतवाल घनश्याम साठे, पोलिस पाटील पती सुधाकर चोठमल, कृषि सहायक विलास ढवळे व गावातील शेतकरी उल्हासराव मेडशीकर, निशांत मेडशीकर, चंद्रकांत घुगे व बाळू घुगे व अजिंक्य मेडशीकर यांच्या सह अजून काही शेतकरी वर्ग उपस्थीत होते.