योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच (महाराष्ट्र) रत्नागिरी शाखा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय मुक्त चारोळी लेखन स्पर्धेचा निकाल 9 सप्टेंबर गुरुवार रोजी घोषित करण्यात आला.या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २२४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच चंद्रपूर शाखेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिसाद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच (महाराष्ट्र) शाखा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आलेली ही तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे परीक्षण डॉ. बा.आं साहित्यिक विचारमंच, ठाणे येथील जिल्हाध्यक्ष नरेंद्र अनंत पवार डोंबिवली यांनी केले आहे. या चारोळी लेखन स्पर्धेत भाग्यश्री निलेश ननिर-नागपूर व पुनम सुलाने हैद्राबाद ह्या सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत. तर माला मेश्राम ठाणे, सिद्धार्थ सुधिर आंबेकर रत्नागिरी, सुरेश शंकर सरवदे सांगली व रोहित विलास साळवे चिंचवड हे उत्कृष्ट ठरलेले आहेत. तसेच डाॅ. ॲड.संतोष दे. सावंत मुंबई, संतोष पहुरकर नांदेड, सुरेश पुंडलिक गेडाम चंद्रपूर, मुकेश देवराव नागदेवते चंद्रपूर व वैशाली गायकवाड खंडारे औरंगाबाद हे प्रथम आले आहेत. तर द्वितीय पुरस्कारामध्ये आशुतोष जाधव रत्नागिरी, सुशिला संकलेचा नाशिक, लता आरेकर इचलकरंजी, संदिप भुक्कन पाटील, सारिका सोनजे नाशिक व अरुण गवई बुलढाणा हे आले आहेत. तसेच तृतिय मध्ये मंगेश गंगाधर सावंत बीड, संगिता मालेकर चंद्रपूर, मधुकर गायकवाड रायगड, सौ. स्वाती कोरगावकर कोल्हापूर, विद्या सूरज साबळे सोलापूर व अंजना गिरिधर बारीक बालेश्वर हे आले आहेत. उत्तेजनार्थ मध्ये अंजूम अकिल शेख वडधा, उमा उके गर्भरेशमी गोंदिया, वर्षा फटकाळे वराडे ठाणे, महादेव तांबे रत्नागिरी, निर्मला जीवने मागपूर, प्रणित जमनादास झाडे चंद्रपूर व सुभाष मानवटकर नागपूर हे आले आहेत. तर लक्षवेधी मध्ये गौरी बाळासाहेब राजगुरु, वासंती राजेंद्र बोराडे रायगड, शारदा अरुण गणोरकर अमरावती, प्रा. भारत एम. झाडे चंद्रपूर, संदिप सुरेश सावंत सिंधूदुर्ग यांचे क्रमांक आले आहेत. तसेच भावस्पर्शी मध्ये भुषण जगन भगत , ॲड. शुभांगी प्रा. अडगोकर अमरावती, गणेश यशवंत घोडके अहमदनगर, शामल अविनाश कामत डोंबिवली व कविता काळे यांचा समावेश आहे. ही राज्यस्तरिय चारोळी स्पर्धा यशस्वीकारण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच (महाराष्ट्र) रत्नागिरी शाखा चंद्रपूरच्या अध्यक्षा भावना खोब्रागडे, सचिव प्रा. प्रशांत खैरे, संघटक राजेश बारसागडे (महाराष्ट्र शासन ‘बालकवी’ पुरस्कृत कवी ) साहित्यिक विचारमंचचे संस्थापक-अध्यक्ष मनोज जाधव, संस्थापक सुरेश कुराडे, संस्थापक, सुनिल सुरेखा संस्थापक, जितेंद्र मोहिते आदींनी सहकार्य केले.