जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर /दि 16 ऑगस्ट 2021
सध्या संपूर्ण जगामध्ये नैसर्गिक पर्यावरणामध्ये बाधा निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. मात्र लातूर शहरांमधील निर्माल्य ग्रुपद्वारा लाल मातीच्या गणपतीची निर्मिती करून एक प्रकारे लातूर शहराच्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धनामध्ये केलेले कार्य हे नक्कीच अभिनंदनीय आणि प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.निर्माल्य ग्रुप लातूर द्वारा आयोजित भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एका विशेष कार्यक्रमांमध्ये ते उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी त्यांच्या शुभहस्ते लाल मातीच्या गणपतीच्या दालनाचे लाल फित कापून उद्घाटन संपन्न झाले यावेळी वर्षा विक्रांत गोजमगुंडे, निर्माल्य ग्रुपच्या मोनिका राठी, शीतल बियाणी, रचना मालपाणी, निर्मला खटोड, प्रशांत राठी, आशिष बाहेती, नितीन भराडीया, पुरण मंत्री, अनिता मालू व विनिता बंग यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, निर्माल्य ग्रुपचे मागील 5 वर्षाचे कार्य हे लातूर शहरासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. लातूर शहरातील पर्यावरण संवर्धनात निर्माल्य ग्रुपची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून निर्माल्य ग्रुप लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये निर्माण झाले पाहिजे त्यामुळे लातूर जिल्ह्याचे नैसर्गिक पर्यावरण आपल्याला संवर्धित करता येईल. लाल मातीचे गणपतीचे घरीच विसर्जन करून त्यात झाडे लावता येतात आज माझ्या घरी गुंड्या आहेत तसेच माजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या घरीही असेच केले जाते. असेही ते म्हणाले.यावेळी वर्षा विक्रांत गोजमगुंडे म्हणाल्या की, निर्माल्य ग्रुपचे सामाजिक कार्य ऐकल्यानंतर मला या ग्रुपमध्ये सदस्य करून घ्या अशी विनंती त्यांनी केली.यावेळी महापौर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी लाल मातीच्या संपूर्ण गणपतीची आस्थेने चौकशी केली आणि लातूर शहरांमध्ये विसर्जनाच्या दिवशी फक्त ईको फ्रेंडली गणपतीसाठी कृत्रिम पॅाड निर्माण करून देण्याचे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले.या कार्यक्रमाला नॅबचे संस्थापक अध्यक्ष डॅा.विजय राठी, गोपीकिशन भराडिया, रोटरी होरायजनचे अध्यक्ष डॅा.संजय गवई, दामोदर भूदडा, राम लाठी, डॅा.सतिष मालपाणी, सीए नरेंद्र बियाणी, पवन मालपाणी व विठ्ठल सोनी आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मालपाणी यांनी तर प्रास्ताविक निर्मला मोनिका राठी तर आभार निर्मला खटोड यांनी मानले.या कार्यक्रमांमध्ये महापौर यांच्या हस्ते ऋषिकेश, इरफान, काटे मामा, योगेश व अमृता या कारागिरांचा सत्कारही करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण राठी व विनोद गिल्डा यांनी परिश्रम घेतले.