सचिन कांबळे
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : नुकत्याच संपूर्ण महारष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार पडल्या , संपूर्ण महाष्ट्राचे अहमनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष्य लागले होते, बऱ्याच राजकीय घोडेमोडी घडल्या असणारे दत्ता (भाऊ) तापकिरे यांचा या निवडणुकीत विजय झाला व त्यांची नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल वार्ड क्रमांक दोनचे कर्तव्यदक्ष नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.सत्कार समारंभासाठी वार्ड क्रमांक दोन मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते , यावेळी बोलताना नगरसेवक तथा अहमदनगर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके बोलत होते दत्ता तापकिरे यांचे काम करण्याची पद्धत खूप दिशादर्शक आहे, ते नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून जात असतात , त्यांचे सामाजिक कार्यात सुद्धा उत्तम काम आहे , त्यांची आत्ता नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाली आहे ,मला विश्वास आहे की, ते या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावतील आणि शेतकऱ्यांना नेहमीच मदत करतील, कारण त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकिर्द्ध हि सामान्य घराण्यातून झालेली आहे . तसेच ते आमचे खास मित्र हि आहेत, त्यांच्या पुढील कार्यायासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना दत्ता तापकिरे म्हटले कि, सुनील त्र्यंबके यांनी आज माझा या साईबाबाच्या पवित्र अशा प्रागंणात भव्य असा सत्कार समारंभ आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आणि या वार्डातील सर्व नागरिक यांचे आभार मानतो, सुनील भाऊ हे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान मार्फ़त अनेक सामाजिक कार्यक्रम घेऊन सामाजिक कार्य करत असतात, सुनील भाऊ नेहमीच भुकालेल्या अन्न तहानलेला पाणी देणे हे त्यांचे कार्य वाखण्याजोगे आहे, त्यांच्या या प्रतिष्ठान मार्फत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, यासाठी वार्डातील लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वजण उपस्थित राहतात . साई बाबाची मनोभावाने पूजा करतात, त्यामुळे सुनील भाऊंवर साईबाबाचा आशीर्वाद आहे , त्यामुळे त्यांना राजकारणात , समाजकारणात यश मिळत आहे , व यापुढेही असेच यश त्यांना मिळो अशी भावना दत्ता भाऊंनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक बाळासाहेब पवार,प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे हभप राजश्री कडलग, आदि उपस्थित होते.