चंद्रकांत श्रीकोंडवार
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : विद्यमान सत्ताधारी सरकारने संसद भवनाची जी नवीन सुसज्ज इमारत तयार केली आहे त्या संसद भवन इमारतीस भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन तमाम भारत वासिय नागरिकांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटने चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केली आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव कायदे तज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परिश्रमाची पराकाष्ठा करून सर्व समावेशक असे सर्व समाजाच्या हिताचे संविधान तयार केले असून भारत देशातील मूलनिवासी बहुजन समाजाच्या नागरिकांना त्यांचे जन्मजात संविधान दत्त हक्क अधिकार न्याय मिळवा यासाठी संविधानात कलम निहाय तरतूद केली आहे. संविधानावर या भारत देशाचा राज्यकारभार सुरळीत पने चालत आहे तसेच या देशातील सर्व नागरिकांना त्यांचे हक्क मिळत आहेत हे त्रिकालाबाधित सूर्य प्रकाशा इतके सत्य असून हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.विद्यमान केंद्र सरकारने नवीन संसद भवनाला भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यास नागरिकांचा शासन प्रशासनावरील विश्वास द्विगुणित होईल. याबाबत विद्यमान केंद्र सरकारने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने सम्यक विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून नवीन संसद भवनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटने चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव एड यशवंत मेश्राम, जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, गौतम रामटेके, मनोज सुख देवें, मार्गदर्शक मनोज मेश्राम, एस के वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, शैलेश वासनिक, नाशिक गणवीर, वनवास बार साग डे, आशीर्वाद रामटेके, मोरेश्वर ले धारे, नरेंद्र कांबळे, अरुण ठवरे,जयेंद्र मुल, उमाकांत काणेकर, वाल्मीक वाल दे, हरिदास बोरकर, डॉ विवेक मोट घरे, मच्छिंद्र टेंभू रणे, विनोद भो व ते,सुभाष शेंडे,दामोधर उके,अक्षय खोब्रागडे, अजित रंगारी, मनोज राऊत, नरेश चव्हाण, प्रतीक्ष कांबळे,धनराज तिरपुडे,नत्थु सूर्य वंशी, विनाश खोब्रागडे, तो तारा म दहिवले,गंगाराम कान्हेकर ,नितीश कान्हेकर,अरुणा दामले, सुवर्णा हुं मने, रूपा लेंढा रे, वन माला बोरकर, नूतन देशपांडे, पुष्पा मुल हेमलता लोणारे, सुनंदा भो व ते, शुभांगी भुतांगे, वच्छला शेंडे,शारदा रंगारी, प पी ता वंजारी, रंजना बार साग डे, धम्म शीला बार साग डे, उर्मिला वाल कर, माधुरी सुख देवें, जयश्री मेश्राम, संयोगिता खोब्रागडे, छाया बोरकर, स्विटी मेश्राम, सरिता नंदा गवळी, अस्मिता कांबळे, वर्षा शेंडे, अनु गेडाम, प्राची मोट घरे, छाया बोरकर,यांनी केली आहे.