गोकुळ हिंगणकर
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा : तालुक्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या चर्चेला उधाण आले असून तालुक्यातील गावागावांमधील ग्रामपंचायतने दवंडी देऊन परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांना आपआपल्या पालकांनी अनोळखी व्यक्ती सोबत जाऊ नये, कोणी काही भेटवस्तू, चॉकलेट किंवा अन्य खाण्यापिण्याचे पदार्थ दिल्यास खाऊ नये असा समज दयावा तसेच गावात अनोळखी व्यक्ती, भिक मांगतांना काही वस्तू विकतांना संशयित महिला व पुरुष आढळल्यास फोटो काढून ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील,पोलीस कर्मचारी यांना याविषयी तात्काळ माहिती दयावी असे तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मार्फत आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले अपहरणा संबंधित फोटो व व्हिडीओ अफवा कि सत्य परिस्थिती यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तालुक्यातील याआधी अपहरणाचे कारनामे झाल्याने काळया जादू मुळे निष्पाप मुलांचा काही नराधमांनी बळी दिला आहे यामुळे पालकांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.
“अकोला जिल्ह्यात व तेल्हारा तालुक्यात अद्याप लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीची तक्रार दाखल झालेली नाही मात्र नागरिकांनी सतर्क रहावे संशयित व्यक्ती आढळल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा व नागरिकांनी भिती बाळगू नये” : ज्ञानोबा फड, पोलीस निरीक्षक तेल्हारा
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)