किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नीत कृषि महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषि औद्योगिक जोड २०२२-२३ या अंतर्गत खरीप २०२२ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे.रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.मात्र यावर्षी पारंपरिक पेरणी पद्धतीला फाटा देत रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन व तुरीची पेरणी करावी असे शेतकऱ्यांना पटवून दिले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच व इतर खर्च देखील कमी होईल. तसेच अचुक अंतर ठरवुन वाण पेरल जाते या रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास एकरी 10 ते 15 टक्के बियाण्याची बचत होते, त्याचबरोबर या पेरणी यंत्रा साठी 30 ते 35 एचपी ट्रॅक्टर सुद्धा पुरेसा आहे या पेरणी यंत्राला वि आकारचे पाते लावलेले असुन ते नाली तयार करुण माती चा वरंबा तयार करतात यामुळे मूलस्थानी जलसंधारण मृदासंधारण तसेच पावसातील खंड आणि अती पावसाने पिकांचे संरक्षण होऊन एकरी 10 ते 25 टक्के उत्पादनात वाढ होते. या यंत्राने आपण सोयाबिन, तुर, मका, उडीद, मुग, ज्वारी, तिळ इत्यादी अनेक वाण पेरू शकतो. यावेळी सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषि महाविद्यालय रिसोड येथील कृषिदूत सुजित रमेश इंगळे, प्रवीण प्रदीप इंगळे , पंकज अशोक सोळंके, अनिकेत पुरी, ओंकार इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ .आशिष अप्तुरकर , उपप्राचार्य डॉ. पी. जी. देवळे, विद्यालयाचे विशेष तांत्रीक समन्वयक मा. आर. एस. डवरे ,RAWE कार्यक्रम समन्वयक प्रा.डी. डी. मसुडकर , कार्यक्रम अधिकारी प्रा.आर. वाय.सरनाईक तसेच विषय विशेषतज्ञ कृषी अभियंत्रिकी प्रा. एम. व्ही. जाधव , विषय विशेषतज्ञ कृषीशास्त्र प्रा. इरफान शेख, प्रा. एस. जे. जाधव, प्रा.व्ही.एस बोडखे यांचे मार्गदर्शन लाभले .