किरण कुमार निमकंडे
अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला : राज्याची उपराजधानी नागपूर पासून अनेक शहरांना मेट्रो रेल्वे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना भारत सरकारने हाती घेतली आहे परंतु यामध्ये पश्चिम विदर्भावर अन्याय झाला आहे. ही मेट्रो रेल्वे सेवा “दिक्षा भुमी नागपूर ते संत भुमी शेगाव” पर्यंत मुर्तिजापूर थांब्या सह सुरू करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे भारत सरकारचे भुपुष्ठ वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांना अकोला येथे आले असता माजी आमदार, वैद्यानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांनी केली आहे. विदर्भातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अकोला जिल्हा,त्याच बरोबर बुलढाणा जिल्ह्यातील देशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत भुमी शेगाव नगरी, जिजाऊ माँ साहेब यांचे माहेर सिंदखेड राजा, संत चोखामेळा यांची जन्म भुमी मेहुन राजा, जग प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर या समुध्द स्थळांनी परिपूर्ण असलेल्या राज्यातील भौगोलिक, इतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमीवर नटलेला अतिशय महत्त्वाचा बुलढाणा जिल्हा. सह विकसनसिल वाशिम जिल्हा हे महत्त्वाचे तिन जिल्हे, या मेट्रो रेल्वे सोई पासून वंचित राहणार आहेत, वास्तविक पाहता मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बैतूल ही शहरे जोडल्या पेक्षाही पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशिम सह अकोला जिल्हा मेट्रो रेल्वे नी जोडणे लोक कल्याणकारी व अतिशय महत्त्वाचे होते, परंतु ते जोडले नाहीत, त्यामुळे पश्चिम विदर्भातील जनतेवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे जनतेत नाराजीचा सूर आहे तरी ही दीक्षाभूमी ते संत भूमी शेगाव पर्यंत मेट्रो सेवा सुरू करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे वैद्यानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर सह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.सदाशिव शेळके, महात्मा फुले समता परिषदेचे महानगराध्यक्ष प्रा.श्रीराम पालकर सह शेकडो कार्यकर्त्यांनी ना.नितीनजी गडकरी अकोला येथे केली आहे, दरम्यान सदर जनहीताच्या मागणीची दखल घेऊन ना.गडकरी यांनी विचार करू असे आश्वासन दिले.