पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : तालुक्यातील नागरिकांनी कोव्हिड लसीकरणाचे दोन डोस घेतले नसतील, तर सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाहीत; तसेच यंदाच्या रब्बी हंगामातील पीक पाहणी ई-पीक पाहणीद्वारे करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली. शनिवारी पोलिस तहसीलदार संजय वारकड शनिवारी पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व महा ई-सेवा केंद्रचालकांची पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व महा बैठक घेतली. ई-सेवा केंद्रचालकांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.कामांबाबत सूचना देण्यात आल्या कन्नड तालुक्यातील सर्व पोलिस पाटील आहेत.सर्व रास्त भाव दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्रचालक, महा ई-सेवा केंद्रचालक यांची तहसीलदार संजय वारकड यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्तरावर करायच्या ‘ई-पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगामाची पीक पाहणी नोंद करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाइल अँपद्वारे ई-पीक पाहणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यावर ऑनलाइन नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ई-पीक पाहणीमुळे पीक नोंदी अद्ययावत होणार आहेत. या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कोव्हिड लसीकरणाचे दोन डोस घेतले नसल्यास सरकारी योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करून वारकड म्हणाले, ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत ग्रामस्तरावर २५ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, यात लाभार्थी शेतकऱ्यांबाबत दाभाडे आदी उपस्थित होते.झालेल्या चुकांची दुरुस्ती, पात्र लाभार्थी यांची भौतिक तपासणी, अपात्र ठरलेल्या लाभाथ्यांकडून दिलेला लाभ वसूल करणे आदी कामे ग्रामस्तरावर कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांमार्फत होणार आहे. बैठकीस तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, शेख हारून, सत्यजित आव्हाड, कुणाल दाभाडे आदी उपस्थित होते.