किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक डॅा. एच.एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली त्याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा प्रशांत ठाकरे यांनी ‘छत्रपती सूत्र विश्वाचे’ या विषयावर बोलतांना वरील प्रतीपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील माजी प्राध्यापक प्रा. ए ओ रघुवंशी, सदस्य, महाविदयालय विकास समीती तथा आजीव सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती हे होते. याप्रसंगी विचार पिठावर प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे, इतिहास विभाग प्रमुख डॅा विनायक वसू, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा प्रसिध्द कवी नारायणराव अंधारे, डॅा दिपाली घोगरे उपस्थीत होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांचे प्रतीमा पूजन व हारार्पनाने करण्यात आली. त्यानंतर मा. प्रशांत ठाकरे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.त्यांनतर महाविद्यालयातील प्रा. समाधान चतरकर यांना भारत सरकार द्वारा दिव्यांगजनांच्या सशक्तीकरणासाठी पि एच डी संशोधनाकरीता दिली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी महाविद्यालयातील अभिनव आणि विद्यार्थी हिताच्या उपक्रमांची माहीती मान्यवरांसमोर मांडली. त्याचप्रमाणे कार्यक्रम घेण्यामागील भूमिका मांडली. महामानवांच्या विचारातुन विद्यार्थी घडतात या उदात्त हेतुने महाविदयालयात कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते असे प्रतिपादन त्यांनी केले.पुढे बोलतांना प्रा प्रशांत ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरेजेचे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग एखादा चित्रपट पहावा याप्रमाणे जीवंत चित्रण त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतुन मांडले आणि श्रोते जणू मंत्रमुग्ध चं झाले होते. अत्यंत अभ्सासपूर्ण मांडणीतुन त्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी शिवाजी महाराज, तत्वज्ञ शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज, पर्यावरण संरक्षक शिवाजी महाराज, व्यवस्थापन तज्ञ शिवाजी महाराज अशा महाराजांच्या अनेक पैलुंवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर नारायणराव अंधारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर कवीता सादर केली.अध्यक्षीय भाषणात प्रा ए ओ रघुवंशी यांनी सांगितले की, आजच्या युवा पिढीने महापुरुषांच्या चरित्रांचे वाचन करायला हवे. संस्कारी पिढी तयार होण्यासाठी हे आवश्यक आहे.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा अरविंद भोंगळे यांनी तर आभारप्रदर्शन डॅा विनायक वसू यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)