किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : अंत्यविधी साठी विलंब लागत असल्यास आवश्यक असणारी शीत शव पेटी आता पातूरवासियांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली आहे. पातुरच्या राजपूत समाज बांधवानी पुढाकार घेत ही शीत शव पेटी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला समर्पित केली आहे. हा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. एखादी मयत झाल्यास मृतकांचे बाहेरील नातेवाईक येण्यास विलंब लागत असल्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी शीत शव पेटीची आवश्यकता असते. ही व्यवस्था पातूर शहरात नसल्याने अनेकांना अकोल्यातून शीत शवपेटीची व्यवस्था करावी लागत असे. यासाठी त्यांना तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत असत. कधी कधी शीत शवपेटी उपलब्ध करण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेत पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने याबाबत आवाहन केले होते. या आवाहनाला पातूर येथील राजपूत समाज बांधवानी प्रतिसाद दिला. अत्याधुनिक शीतशवपेटी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला त्यांनी समर्पित केली. यामुळे पातूवासियांना ही सेवा नाममात्र सेवा शुल्कसह अभ्युदय फाउंडेशन देणार आहे. याबाबत गरजवंतांनी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सभासदांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यामध्ये राजपूत समाज बांधवातर्फे वीजयसिंह गहिलोत,भोजराजसिंह बैस, अजितसिंह गहिलोत, राकेशसिंह बैस, विपीनसिंह गहिलोत, निखीलसिंह बैस, आशिष्यसिंह गहिलोत, अभिजितसिंह गहिलोत, करणसिंह गहिलोत, अंकीतसिंह बैस यांनी अभ्युदय फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी उर्फ गोविंदसिहं गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रविण निलखन, प्रशांत बंड, अंकित निमकंडे या सभासदांना ही शीतशवपेटी समर्पित केली.
यावेळी शुभम पोहरे, संतोष लसनकार उपस्थित होते.