महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा आहे,असे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी भद्रावती तालुक्यातील कुचना वसाहतीत आयोजित कार्यक्रमात केले.वसाहतीतील श्री. सत्संग मंडळातर्फे आयोजित श्री. गणेश मंदीराच्या प्रांगणात आयोजित श्री. गणेश प्राणप्रतिष्ठा वर्धापन उत्सव व संगीतमय प्रवचन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ.आगलावे प्रमुख अतिथी म्हणून बोलत
होते.कार्यक्रमाची सुरूवात देवी-देवतांचे सामुहीक औक्षवण, अभिषेक तथा आरती करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन वेकोलि माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक व्ही. के. गुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.कार्यक्रमात डॉ. आगलावे आपल्या भाषणात म्हणाले की, शेतक-यांना वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता अर्पण केली. शेतकरी हाच संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. हा कार्यक्रम ज्या वसाहतीत होत आहे, ती वस्तीच शेतक-यांच्या जमिनीवर वसलेली आहे. त्यामुळे शेतक-यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. नोकरी किंवा शेतीच्या जमीनीचा मोबदला योग्य व लवकरात लवकर देण्यात यावा, अशी विनंतीवजा मागणीही डॉ.अंकुश आगलावे यांनी महाप्रबंधक व्ही.के. गुप्ता यांच्याकडे यावेळी केली. सत्संग कार्यक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कृत नागरीक घडविता येते. असेही डॉ. आगलावे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमात ग्रामगीताचार्य ह.भ.प. सुश्री आशाजी दाणी बोरी अरब यांचा सत्कार डॉ. आगलावे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाप्रबंधक व्ही. के. गुप्ता यांच्या हस्ते डॉ. आगलावे यांचा समाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुदाम ठक, उपाध्यक्ष दिपक देरकर, सचिव देवानंदजी पोडे, सहसचिव अनंत सोमसेटवार, कोषाध्यक्ष बापूरावजी दुबे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात कुचना कॅम्प वसाहतीतील अनेक नागरीकांनी सहभाग घेतला.