शेतकऱ्यांना मदत देण्याची किसान युवा क्रांती संघटनेची मागणी
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१८:-सतत तीन दिवस भद्रावती तालुक्यात गारपिट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेतर्फे एका निवेदनाद्वारे येथील तहसीलदारांकडे नुकतीच करण्यात आली. तालुक्यात काही भागात जोरदार व काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत दयावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेने केली आहे. अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, वाटाणा, मिरची, मुंग, भाजीपाला पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. तरी लवकरात लवकर मदत दयावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेने केली. तहसीलदार यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार एस.यु.भांदककर यांनी यावेळी निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गेजिक, विकास गजभे,भारत बेलेकर, रोशन मानकर,अजय मत्ते,अभिषेक भोयर,पंकज पंडीले उपस्थित होते