अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी तलासरी
तलासरी : दरवर्षी कासा येथील साई भक्त बाबांची पालखी श्रावण मध्ये घेऊन जातात,दरवर्षी प्रमाणे या वेळेस सुद्धा 15 ऑगस्ट च्या दिवशी कासा येथील निघालेली पालखी 23 ऑगस्ट रोजी शिर्डी वरून परत येत असताना विक्रमगड तलावली येथे त्यांचा पीकप आपल्या साईड ने येत असताना अचानक समोरून भरधाव वेगात कार आल्याने पिकप चालकाने आपली पीकप रोड चा बाजूला घेतली कारण कार आपल्याला धडक मारू नये म्हणून परंतु हे होतं असतानाच मध्येच बाईक सुद्धा आल्यामुळे मोठा अपघात घडला, आणि बाईक पीकप येऊन धडकली,पीकप वरील ताबा सुटला त्यामुळे रोडच्या खाली जाऊन पालटली या अपघातात काहीक किरकोळ जखमी झाले आहेत, जखमी झालेल्या रुग्णाना जव्हार येथील ग्रामीण रुगणांलयात येथील ऍडमिट करण्यात आले आहे, या घटने मुळे विक्रमगड तलावली भागात एकच खळबल उडालेली आहे. या आधी सुद्धा या रोड वरती खूप अपघात झालेले आहेत कारण हा पूर्ण रोड वळणाचा असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्या दिसत नाही असताच चालक ही भरधाव वेगाने गाड्या चालवत असतात त्यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणात ए्सीडेन्ट होतं असतात असे स्थानिक नागरिकांनी माहिती दिलेली आहे.