विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेली विकासकामे आणि यशस्वी रित्या राबवलेल्या योजना घराघरापर्यंत पोहचवणे अभियानाचा उद्देश आहे.शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींना पोहोचवुन त्यांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत.त्याचबरोबर देशातिल बदललेली परिस्थिती नव मतदारांना आकर्षित करत आहे.देशात कमी झालेला भ्रष्टाचार, निर्माण झालेल्या विविध संधी आणी जगभर देशाची उंचवलेली प्रतीमा यामुळे तरुण वर्गातही भाजपची क्रेझ वाढत आहे .असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी केले आहे . मोदी @9 सेवा सुशांत आणि गरीब कल्याण भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे आपल्या पर्यंत हिंगोली विधानसभेत 60हजार घर चलो ,अभियानाच्या माध्यमातून पञके वाटप करण्याचे काम चालू आहे.यावेळी उपस्थित रामचंद्र गावंडे पाटील रामेश्वर भालेराव ,वैभव जुनघरे, विकास पठाडे ,वामन भालेराव, प्रल्हाद भालेराव ,गजानन भालेराव, गजानन भालेराव,रामराव जगदाळे,दिपक डोळसकर उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)