पातुर तालुका विकास मंचाचे शिवकुमार बायस यांची मागणी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या उद्योगनगरी मध्ये असणाऱ्या कामगार नगरीतील त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याने प्रयत्न करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस यांनी यावेळी केली.
खासगी कंपन्या,बांधकाम व्यवसाय,हाॅटेल क्षेत्र तसेच इतर ठिकाणी काम करणा-या सर्व सामान्य कामगारांची खुप दयनीय अवस्था झाली आहे.ब-याच आस्थापना आता कामगारांना कायमस्वरूपी त्यांच्याकडे सेवेत रूजू करून घेत नाही.आजकाल सगळ्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते.त्यांना कायमस्वरूपी कामगारांच्या प्रमाणे सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या कुटूंबाचे तसेच त्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचे खुप मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे अशा कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून प्रभावी उपाय योजना करण्यात याव्यात अशा स्वरूपाची मागणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सहाय्यक आयुक्त घनश्याम कुळमेथे यांच्या कडे करण्यात आली आहे.
याप्रसंगी भोसरी विधानसभा अध्यक्ष राणा अशोक इंगळे,नागेश शेरखाने, ज्ञानेश्वर सुरडकर हे उपस्थित होते.