अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी- अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असुन काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.वाकडवाडी रस्त्याला अडरपास देण्यात न आल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.मेडशी गावाला जंक्शन देण्यात न आल्याने सरपंच शेख जमिरभाई जनआंदोलन उभे करत आहेत.मेडशी ते वाकडवाडी रस्त्यावरील लहान पुल घोक्याची घंटा देत असून रस्त्याची अगदी चाळण झालेली आहे.रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडल्याने त्यात पाणी साचले आहे.त्यावर कळस म्हणजे जुन्या डांबर रस्त्याचे खोदकाम करून कंपनीने ते मटेरियल पुलाच्या रस्त्यावर टाकल्याने मोठं मोठ्या खड्ड्यात पाणी साचले आहे.खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने येथे अनेक वेळा दुचाकी खड्ड्यात पडून अपघात घडले आहेत.अकोला- नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असुन बायपास रस्ता गावाबाहेरून काढण्यात आला आहे.मेडशी ते वाकडवाडी रस्ता बायपासला टच आहे.याच रस्त्याने चौपदरीकरणाच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाचाची वाहतूक होत असल्याने रस्त्याची अगदी चाळणं झालेली आहे.सदर रस्त्यावरून दररोज रात्रंदिवस 50 च्या आसपास टिप्पर चालविले जात असल्याने जागोजागी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याला समतोल जुना लहान पुल आहे.नाल्याला पुर येऊन पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याच मार्गावर प्रसिद्ध महादेवाचे जागृत मंदिर असुन ते डाग या नावाने प्रसिद्ध आहे.जागृत देवस्थान असल्याने दूरवरून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात.कंपनीने डांबर रस्त्याचे खोदकाम करून मटेरियल पुलाच्या रस्त्यावर टाकल्याने अडथळा निर्माण झाला आहे.साचलेल्या पाण्यामुळे पाण्याचा अंदाज येत नसल्याने ग्रामस्थ,शेतकरी आणि भाविकांचे या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडले आहेत. त्यात भरीस भर कंपनीने डांबर रस्त्याचे खोदकाम केले असून मटेरियल चक्क पुलाच्या रस्त्यावर आणून टाकल्याने अपघातास आमंत्रण दिले जात आहे.सदर पुलाच्या रस्त्यावरील मटेरियल उचलण्याची आणि रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी सरपंच शेख जमिरभाई शेख गनिभाई यांनी केली आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)