रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या कार्याला यश
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
गुलाब नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत राखी राजकुमार जाधव बी.एस. सी.भाग.१ ला २०१९-२० ला प्रवेशित होती.सदरहू विद्यर्थिनीने भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरला व महाविद्यालयात पाठविला परंतु महाविद्यलयाच्या क्लर्क लॉगिन मधून अर्ज प्राचार्यांच्या कडे पाठविण्यात आला.त्यामध्ये त्रुटी असल्याने रितसर विद्यार्थिनीला त्याबद्दल कळविणे हे महाविद्यालय प्रशासनाचे काम होते.परंतु सदर विद्यार्थिनीला ह्या सर्व प्रकारामुळे आर्थिक शैक्षणिक व मानसिक नुकसान झाले असून सादर प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या गुलाब नबी आझाद महाविद्यालयातील प्राचार्य व जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थिनीला पुढील शैक्षणिक सत्रासाठी शिष्यवृत्ती चा लाभ देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त ह्यांना दिलेल्या निवेदनात केली होती.ह्यावेळी विद्यार्थिनी राखी जाधव सुद्धा हजर होती.तरी समाजकल्याण कार्यलयामार्फत सहसंचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती ह्यांना दिलेल्या पत्रात सदर शिष्यवृत्ती योजनेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्रथम अंमलबजावणी अधिकारी असून भारत सरकार शिष्यवृत्ती योजने संबंधाने मागासवर्गीय विदयार्थ्यांच्या अर्जावर विहित केलेल्या कालमर्यादेत नियमानुसार कार्यवाही आवश्यक आहे.यावरून महाविद्यालय प्रशासन हे मागासवर्गीयांचे योजनेची अंमलबजावणी करण्यात उदासीनता दिसून येत असून प्राचार्य यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे.तद्वतच महाविद्यालया कडून प्राप्त खुलासा वरून संबंधित महाविद्यालय प्रशासन मागासवर्गीय विद्यार्थ्यां प्रति संवेदनशील नसल्याचे दिसून येत आहे. तरी महाविद्यालया कडून देण्यात आलेला खुलासा अमान्य आहे.तरी शासन निर्णय दिनांक 1 नोव्हेंबर 2003 अन्वये विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्याची संपूर्ण जबाबदरी संबंधित प्राचार्याची असून यात विलंब झालेला असल्याने संबंधीत शैक्षणिक संस्थेविरुद्ध दंडनीय आणि व्यवस्थापन त्याबाबतची जबाबदारी संबंधितांवर 15 दिवसात निश्चित करून संबंधिता विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी अशी तरतूद आहे .तरी गुलाब नबी आझाद महाविद्यालाय आपल्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये असल्याने यावर कार्यवाही करण्यात यावी असे पत्र समाजकल्याण आयुक्त पियुष चव्हाण ह्यांच्या स्वाक्षरीने समाजकल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य,कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग अमरावती,प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग अमरावती ह्यांना पाठविण्यात आले असून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी सदर विद्यार्थिनीला न्याय मिळवून दिला बद्दल समाजकल्याण विभाग अकोला चे आभार मानले असून कुठल्याही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न दडवता त्यांना त्याचा अधिकार मिळवून दयावा अन्यथा अशा तक्रारी प्राप्त झाल्यास विद्यार्थी हितार्थ कुठल्याही महाविद्यालयाची गय केली जाणार नाही असा सजक इशारा दिला.