अविनाश पोहरे /ब्युरो चिफ,पातूर
भारतीयांच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे सर्वोच्च मानलं जातं. त्यामुळं गुरुपौर्णिमेला भारतात विशेष महत्व आहे. आषाढ महिन्याची सुरुवात या दिवसाने होते. भारतीय संस्कृतीत आई- वडीलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आलं आहे. गुरु हा आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. याच गुरुचे आभार मानन्यासाठी भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. दरवर्षी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने पातुर तालुका राष्ट्रधर्म युवा मंचाच्या वतीने विश्वधाम टेकडी वर राम कृष्ण हरी मंदिराच्या परीसरात वृक्ष रोपण करण्यात आले .त्या प्रसंगी गुरुदेव सेवाश्रम पातुरचे ह.भ.प.तिमांडे महाराज राष्ट्रधर्म युवामंचाचे ता.अध्यक्ष संदीप गिऱ्हे, मंगेश राऊत, शुभम उगले, मनोज इंगळे, सागर राखोंडे, आकाश गाडगे ,प्रवीण राऊत , अमोल डीवरे ,गजानन जवंजाळ , प्रज्वल भाजीपाले , विक्रांत सरोदे व इतर सदस्य उपस्थित होते.