अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव-शासनाने 15 जुलै पासून शाळा ऑफलाईन सुरू करण्याचे आदेश दिले व मालेगांव तालुक्यात शाळा सुरू झाल्या .शाळेची घंटा वाजली पण विद्यार्थ्यानी शाळेकडे पाठ फिरविल्याने शाळा ओस पडल्या आहेत.अजूनही विद्यार्थी कोरोनाच्या दहशतीत असल्याचे चित्रण दिसत आहे .कोरोनाच्या संकटाने अख्या देश लॉक डाऊन झाला.शिक्षण संस्था दीड वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.ऑनलाइन शैक्षणिक धोरणाचा फज्जा उडाला. इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्यात. शालेय मूल्यमापणावर इयत्ता दहावीचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला.त्यामध्ये विद्यार्थाना चांगल्यापैकी टक्केवारी मिळाली पण विद्यार्थ्यांचे कोरोनामुळे अतोनात नुकसान झाले आहे.आता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने 8 ते 12 व्या वर्गापर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. शाळेची घंटा वाजली.पण विद्यार्थी संख्या नगण्य होती. माध्यमिक विद्यालयात व उच्च माध्यमिक विद्यालय 8 ते वर्ग दहावीची पटसंख्या 136 असून त्यापैकी केवळ 29 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.पोस्ट बेसिक विश्वभारती आश्रम शाळेतील वर्ग 8 ते 10 वीची विद्यार्थी पटसंख्या केवळ 43 असून त्यापैकी एकही विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा ओस पढल्याचे चित्र दिसले.अजूनही पालक कोरोनाच्या दहशतीखाली असल्याने ते पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचे दिसत आहे.