राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – ग्रामपंचायत किष्टापुर वेल अंतर्गत येणाऱ्या मद्दीगुडाम हा गाव आलापल्ली येतून चार कि.मी अंतरावर आहे. हा रस्ता छत्तीसगड ला जाणारा महामार्ग असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचां कळपांमुळे वातुकीला अडथडा निर्माण होत आहे. याबद्दल संवर्ग विकास अधिकारी अहेरी, मद्दीगुडम या गावाला भेट देऊन मोकाट जनावरंचा बंदोबस्त करण्याचे आव्हाहन केले.मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत भर रस्त्यावर राहतात. ये जा करण्याचा वाहनचालकांना व सामान्य माणसांना त्याचा गांभीर्याने त्रास होत असल्याचा गट विकासअधिकारी यांना माहीत होताच मद्दीगुडाम या गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून गावकऱ्यांशी बैठक घेतली. जनावरे मोकाट सोडल्यास कोंडवड्यात टाकून 17 दिवसानंतर लिलाव करण्यात येइल व याचात कोणी अडथडा निर्माण केल्यास कायदेशीर फौजदारी गुणा दाखल करण्यात येइल असेही त्यांनी सांगितले. गाव स्वच्छ ठेवण्याकरिता गावकरी एकत्र होणे व वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे व अस्वच्छते पासून निर्माण होणारे अनेक रोगांना परिसर स्वच्छ ठेवून ठाडण्यात येतील असे त्यांनी मत व्यक्त केले. या बैठकीत ग्रा.पं सचिव, सरपंच, सदस्य, पोलिस पाटील आदी अनेक गावकरी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)