पातुर तालुका विकास मंचाची तहसीलदार मार्फत महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागणी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रात तहसील कार्यालयात अल्पशा मानधनात इमानदारीने काम करणाऱ्या सामान्य कोतवालाला शिपाई पदावर पदोन्नती मिळावी यासाठी पातुर तालुका विकास मंचचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी पातुर तहसील कार्यालयाचे तहसीलदार दिपक बाजड यांच्या मार्फत महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महागाई ने होरपळून निघालेल्या आपल्या देशातील प्रत्येक घटकातील सामान्य माणूस खुप अडचणीत सापडला आहे.प्रत्येक माणूस तारेवरच्या कसरतीप्रमाणे आपले व आपल्या कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह चालवत आहे.
निसर्गाची वक्र दृष्टी पडलेल्या शेतकरी वर्गावर सतत टांगती तलवार असल्याचे चित्र आहे.
असे शेतकरी पुत्र तसेच सामान्य कुटुंबातील हातमजुरी करणारे नागरिक कोतवाल म्हणून तहसील कार्यालयात काम करत आहेत त्यांना खूप कमी असे मानधन आहे आणी या मानधनात त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या पोटाची खळगी निट भरता येत नाही तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलता येत नाही या सर्व बाबी लक्षात घेता मायबाप सरकारने कोतवाल असलेल्या कर्मचाऱ्यांना शिपाई म्हणून पदोन्नती द्यावी तसेच सेवानिवृत्त झालेल्यांच्या पात्र उमेदवारांची त्यांच्या जागी नियुक्ती करावी या स्वरूपाची निवेदनात मागणी आहे.
प्रशासन याकडे किती गांभीर्याने दखल घेते याची उत्सुकता लागली आहे.
निवेदन देतांना पातुर तालुका विकास मंचचे ठाकुर शिवकुमारसिंह बायस,गणेश गाडगे, किरणकुमार निमकंडे,महेश बोचरे,रामा भाऊ राऊत, योगेश फुलारी,राहूल अत्तरकार,विनोद तेजवाल, रंजीत गाडेकर, अजित अल्हाट व मंचाचे इतर पदाधिकारी उपस्थीत होते