गंगाधर सुरळकर
ग्रामीण प्रतिनिधी तरोडा कसबा
मृग नक्षत्रानंतर पावसाने दडी मारून गेल्या दोन दिवसापूर्वी पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्याचा चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती दयनीय झाली होती परंतु शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्री सुद्धा विजेच्या कडक ड्यासह दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला ज्या शेतकऱ्याचा पेरण्या रखडल्या त्याशुद्धा आता त्या पूर्ण होणार आहे शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे .











