विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
चंद्रपुर /-चिमूर पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडसंगी ताडोबा रोडवरील कार्नरवर दोन चारचाकिं वाहनांचा समोरासमोर अपघात झाला असून, कोणतीही जिवीतहानी घडलेली नाही. चिमूर वरोरा राज्यमाहामार्गावर अनेक भरधाव लहान, मोठे, वाहन धावत असते. तसेच खडसंगी जवळून ताडोबाकडे जाण्याचा मार्ग असून, येथील बफर जंगल परिसराला लागून अनेक रिसोर्ट ची वसाहत आहे. या रिसोर्टवर विदेशातील, विदर्भातील अनेक नामवंत नागरिक मुक्कामी असतात. खडसंगी जवळून अवघ्या तीन किमी वर रिसोर्ट लागून असल्यामुळं तेथून चिमुरला फिरण्यासाठी या रिसोर्ट मधून चारचाकी वाहनाने ये जा करीत असतात. आज दुपारी जवळपास 4 वाजताच्या दरम्यान ताडोबा वळणावरून चिमुरकडे जाण्यासाठी म्हणून एमएच 31 ई के 3224 या नंबर ची असलेली मारुती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहन असून गाडीचे चालक वैभव मेहता माणिकनगर नागपूर हे चालवित असून, ताडोबा वळणा वरून चिमुरकडे जात होती. तर दुसरी चारचाकी वाहन मालक सचिन बोभाटे राहणार कुटकी तालुका हिंगणघाट यांच्या मालकीची असून, एमएच 46 डब्लू 2590 (बोलेरो) हि चिमूर वरून भरधाव वेगाने येत असून, दोन्ही गाडीतील चालकाचे लक्ष नसल्याने हा जबरदस्त अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा अपघात इतका जबरदस्त होता की, विद्युत वितरण विभागातील लोखंडी पोलाला लागून असलेल्या जिवंत तारा तुटल्या मात्र यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्यामुळं खडसंगी येथील नागरिक व चिमूर पोलिसांनी सुटकेचा स्वास् सोडला.सदर घटना चिमूर पोलिसांना माहिती होताच घटनेचा तपास चिमूर पोलीस करीत आहेत.