वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव शहरातील नवीन वस्ती प्रभाग क्रमांक 14 येथील अरुण वानखेडे ,विवेक लढी ,मोरे यांच्या घराजवळील रस्त्याने पाऊस आला की पावसाचे पाणी साचल्या जाते सीमेट रोड करण्यात आला मात्र रोडच्या दोन्ही बाजूला नाल्याचे बांधकाम न झाल्याने पाणी जाण्याला मार्ग नाही त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शीरत असल्याने तेथील नीवासीना मनस्तापासोबत नुकसान हि सोसावे लागत आहे याकडे नगर पंचायत राळेगाव यांनी लक्ष देण्याची गरज आहे
यावर्षी मृगाच्या पारंभा पासून धुव्वाधार पावसाने हजेरी लावली होती गेल्या सप्ताहात शहराला जोरदार पावसाने झोडपून काढल्याने रस्त्यावर पावसाचे पाणीच पाणी साचले रस्त्याच्या दोन्ही साइडला नाली नसल्यामुळे पाणी जान्याचा मार्ग बंद असल्याने पावसाचे पाणी घरात शीरल्या जाते वार्डातील नगरसेवक व नगर पंचायतीला वारंवार सुचना देवूनहि रस्त्यावर पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सोडण्यात आलेला नाही याकडे नगर पंचायती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहे
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)