सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी कासारखेड
साखरखेर्डा : ” कायदा सर्वासाठी समान आहे त्यामुळे खाकी वर्दीतला रक्षक म्हणून आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. कायदेशीर कामे करताना अनेकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते, वस्तुतः कायद्याच्या रक्षकाला जनतेने सहकार्य केले पाहिजे. नियम पाळून कायदेशीर पालन करणारा हाच खरा पोलीस मित्र असून अशा मित्रांची आज पोलीसांना गरज आहे ” असे मत साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केले. दि 18 जुन रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ग्रंथ, सॅनिटायझर मास्क तुला समारंभात ते बोलत होते.
आपल्या प्रस्ताविकात संतोष गाडेकर यांनी कोरोनाच्या टाळेबंदीत धडपडणाऱ्या ठाणेदार आइते आणि पोलीसांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. इतिहासात प्रथमच साखरखेर्ड्यात ठाणेदारांची तुला करण्यात आली. सकाळी 6 ते 7.30 पर्यंत बालयोगी वरद संतोष जोशी याने योगाचे धडे दिले, तर 9 ते 11 वा संगीत विशारद प्रा अभय मासोदकर आणि संच विवेकानंद आश्रम यांचा भक्तीसंगिताचा रसपूर्ण कार्यक्रम पार पडला. तद्नंतर हदगाव पीठाचे मठाधिपती सोमनाथ स्वामी यांच्या मंत्रोच्चारात ठाणेदार जितेंद्र आडोळे यांची पाचशे ग्रंथ, 40 लिटर सैनिटायझर, पाचशे मास्क, पीपीई किट टाकून तुला करण्यात आली. सदर ग्रंथ राज्यसेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वाचनालय अभ्यासीकेला भेट देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल स्मिता मानघाले यांनी केले तर आभार पो हे कॉ गणेश डोईफोडे यांनी मानले.
दरम्यान साखरखेर्डा परिसरातील शेकडो पोलीस मित्रांची ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना सदिच्छा दिल्या. या प्रसंग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ब्लडबॅंक चमुला 1 तासात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचा वापर करून केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस मित्र मंडळाच्यावतीने या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.