शकील खान / मूर्तिजापूर
मुर्तिजापूर – नगर परिषद द्वारे राबवली जाणारी योजना अनेक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे म्हणून शासनाने या संदर्भात काळजी घेऊन पंतप्रधान घरकुल आवास योजनेमधील समस्या निकाली काढावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे
गेल्या दोन ते तीन वर्षापासून हजारो नागरिक पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे आतापर्यंत या लाभार्थ्यांना फक्त निराशा मिळालेली आहे म्हणून या सर्व समस्याकडे जिल्हाधिकारी यांनी परिसर पाठपुरावा करून घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडवावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी निवेदनाद्वारे केली आहे