जनजागृती करिता पातुर नगरपालिकेने घेतला पुढाकार
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातुर शहरामध्ये कोरोना रुग्णांमध्ये बरे होण्याची संख्या अधिक असली तरी गेल्या दोन महिन्यात 40 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने पातुर नगरपालिकेने जनजागृती करण्याकरिता पुढाकार घेतला असून तपासणी करता सुद्धा पुढाकार घेतला आहे.30 मे रोजी पातुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव आणि नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सय्यद अहेफाजोद्दीन आणि पातुर नगर परिषदेचे बांधकाम सभापती राजू उगले यांनी स्वतः प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पातूर शहरातील ग्रामस्थांना तपासणी करण्याचे आवाहन केले तसेच शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून वेळोवेळी साबणाने हात धुण्याचे त्यांनी जनजागृती करताना सांगितले यासोबतच सार्वजनिक रित्या विविध चौकांमध्ये त्यांनी लाऊड स्पीकर मधून कोरोना ला
पातुर मधून हद्दपार करण्याचे त्यांनी आवाहन केले.पातुर शहरात सॅनिटायझर ची फवारणी सुद्धा या आधी करण्यात आली आहे मात्र ग्रामस्थांनी घरामध्ये सुद्धा राहून सहकार्य करावे आणि महत्त्वाच्या कामाकरता बाहेर पडावे अन्यथा वीना मास्क बाहेर फिरू नये तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी सल्ला घेत राहावा असे आवाहन यावेळी पातुर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी केले आहे.