मोठा भाऊ बालंबाल बचावले
रोजगारासाठी अख्खे कुटुंब आले होते पातूर वरून पुण्याला.
खानापूर पातूर येथे शोककळा
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातूर रोजगाराच्या शोधात आलेला पातूर येथील विद्यार्थी आनंद प्रमोद शिरसाट वय 19 ह.मु. रा.निगडी पुणे व मुळगाव खानापूर तालुका पातुर जिल्हा अकोला या विद्यार्थ्याचा व उमद्या गायकाचा निगडी येथील शक्ती- भक्ती चौक पुणे येथे एका अज्ञात वाहनाने दोघे भाऊ देहूरोड कडे जातांनी अँक्टिव्हा दुचाकीस मागून जबर धडक दिल्याने या युवकाचा जागीच दुदैवी करून अंत झाला व या अपघातामध्ये त्याचा मोठा भाऊ सुदैवाने बालंबाल बचावले या घटनेने खानापूर पातूर येथे नीरव शांतता पसरलेली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आनंदला ने नुकतीच यावर्षी बीए भाग 1 मध्ये पातूर येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता तो अत्यंत हुशार व देखणा व गोंडस चांगला मुलगा होता त्याचे आई-वडील मागील पाच सहा वर्षापासून पुणे येथे कामानिमित्त गेले होते. त्याचे आई वडील भाऊ प्रतिक व आनंद एका खाजगी कंपनीत कामाला होते.
26 मे रोजी बुधवारी निगडी वरून आपल्या भावासोबत ॲक्टिवा दुचाकीने देहू रोड कडे जात असता निगडी येथील शक्ती भक्ती चौका नजीक मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देऊन अक्षरशः त्याच्या डोक्यावरून अज्ञात. वाहनाचे चाक गेल्याने त्याचा मेंदूच बाहेर पडल्याचे संबंधीत नातेवाईकांनी सांगितले. मात्र अँक्टिव्हा दुचाकी चालवत असलेला त्याचा भाऊ प्रतिक सिरसाट हा सुदैवाने दूर फेकला गेला त्यामुळे तो बालंबाल बचावले.’ देव तारि त्याला कोण मारी ‘ त्याच्या भावा बाबत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
याप्रकरणी निगडी पुणे पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केल्याचे नातेवाईकांनी दाखल केल्याचे सांगितले आहे.
निगडी येथे उड्डाणपुलाचे काम चालू असून शक्ती भक्ती चौकात नेहमीच वर्दळ असून हा रस्ता वर्दळीचा केंद्रबिंदू ठरत आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा अक्षरात चुराडा झाला व मृतक आनंदाच्या डोक्याचा मेंदूही बाहेर पडला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतक आनंदच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
…चौकट…
आनंदचे मिस्टर अंँडी या नावाने त्याचे अकाउंट असून त्याला गाण्याचा खूपच चांगला छंद होता. आठ-दहा दिवस आगोदरच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पातुर येथील एका महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला होता गुरुवारी सकाळी आठ वाजता दरम्यान अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा आप्त परिवार आहे.