पवनकुमार भोकरे
तालुका प्रतिनिधी, पाटोदा
दि. ९ एप्रिल – पाटोदा शहरातील मुख्य जलवाहिनी सिमेंट पाईपलाइन फुटल्यामुळे गेले १५ ते २० दिवस संपूर्ण शहर पाण्याविना तडफडत आहे. दररोजची जीवनशैली विस्कळीत होत असून, नगरपंचायत प्रशासन मात्र केवळ आश्वासनांच्या पलिकडे काहीच करत नसल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाणी ही जीवनावश्यक गरज असूनही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.मुख्य लाईनमधील गळतीमुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशःसंघर्ष करावा लागत आहे.असल्यामुळे पाण्यासाठी वादविवादाचे प्रकार सुरू आहेत.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून फक्त आश्वासन दिले जात आहे. फुटलेली पाईपलाइन अद्यापही दुरुस्त न झाल्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त आहेत. “नगरपंचायत फक्त तोंडावर बोट ठेवून बसली आहे,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या पाणी टंचाईमुळे शहरातील आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.


