रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव :
उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केल्या जाते.भगर खाल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत.भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजीलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो.ज्यामुळे फ्युमीगा क्लेवीन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.आकटोबंर महिन्यांतील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते.अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खान्यात आल्यास अन्न विषबाधा होउ शकते त्यामुळे भगर खातांना खालील प्रमाणे काळजी घ्यावी.बाजारातुन भगर आनल्यावर ती निवडुन स्वछ करा शक्यतोवर पाॅकिट बंद भगर घ्या ब्रॅड नांव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाॅकिटे व खुली भगर घेउ नका.भगर घेतांना पाॅकिटावरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा भगर साठवतांना ती स्वछ व कोरड्या ठिकाणी व्यवस्थित झाकनबंद डब्यात ठेवा.जेनेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही.जास्त दिवस भगर साठवु नका,दिवस साठवलेली भगर खाऊ नका.शकयतोवर भगरीचे पीठ विकत आणु नका.भगरीच्या पीठामध्ये वातावरणातील ओलावा शोधुन घेन्याची क्षमता अधिक असते त्यामुळे पीठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.त्यामुळे भगरिच्या दशम्या, किंवा भाकरी खानच्या ऐवजी खिचडी खावी.भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत.दोन ते तीन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थांचे सेवन अॅसिडीटी वाढन्यास कारणीभुत ठरते.त्यामुळे उलटी,मळमळ,चक्रा येणे, आणि पोटाचे त्रास वाढतात.या पदार्थाचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादितच करावे.भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवने गरजेचे आहे, म्हणजे संभाव्य उपाय टाळता येईल.त्याचबरोबर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार भगर विक्रेत्यासाठिहि सुचना देण्यात आल्या आहेत.भगर विक्रेत्यांनी पॅकेट बंदचीच विक्री करावी,भगर खरेदी करतांना घाउक विक्रेत्याकडुन पावती घ्यावी.भगरीचे पॅकेट, किंवा पोत्यावर उत्पादकाचा पता ,परवाना क्रं, पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक,असल्याची खात्री करून घ्यावी.मुदतबाह्य भगर किंवा भगर पीठाची विक्री करू नये.सुटी भगर व खुले भगर ,भगर पिठ शक्यतोवर विक्रीसाठी दुकानात ठेउ नये.अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानाची तपासणी करन्यात येत आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आव्हान अन्न औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


