अकोला : जिल्ह्यातील सातही तालुक्यात बुधवार , २१ जुलै रोजी रात्री मुसळधार पाऊस बरसला असून जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदीनाल्यांना पुर आला असुन जिल्ह्यातील विवीध भागात पाणी साचले. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात शेकडो घरांची पडझड तर खरिप पिके पाण्याच्या खाली गेले. आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी पुन्हा अस्मानी – सुलतानी संकटात सापडला. अशा परिस्थितील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवचरित्रकार प्रा.अनुप बोचरे विवरेकर यांनी केले. त्यांच्या आवहनाला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी पालक, शिक्षक , कर्मचारी , सहकारी यांनी भरभरून आर्थिक मदत केली. या निधीतुन जीवनावश्यक वस्तूंच्या किट बनविण्यात आल्या. पुरग्रस्तांना जीवनावश्यक किट बनविण्याचे काम अध्यक्ष खंडारे, मंदार बरडे , निनाद, गावंडे, ऋषिकेश करवले, विवेक बोदडे, दिक्षा घोरे, वेदांत राऊत, आस्था चव्हाण , वैष्णवी शिरे, कृतीका शिरसाठ, ऐश्वर्य राव, कल्पना राव, निशांत गायकवाड, अथर्व गजबे यांनी करून या कार्याला केले. ‘माणुसकीचा मदतीचा हात “ या उपक्रमासाठी शिवचरित्रकार प्रा . अनुप बोचरे विवेकर यांच्या मार्गदशना खाली समीती नेमण्यात आली .
त्यामध्ये अॅड. अनुराधा दुबे, स्वप्नील शेळके, सचीन गावंडे, महेश मेरांगे, अजय घुगे, सागर बडोदे, प्रा. गोपाल वांडे , प्रणव केदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोला जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी पुरग्रस्तांना पाठविल्या जाणाऱ्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवानगी केली. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून उप जिल्हा दंडाधिकारी प्रा . संजय खडसे यांनी समन्वयाची भुमिका पार पाडली… बाळापुर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी व तहसीलदार श्री. मुकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप मंडळ अधिकारी गजानन फिरके व तलाठी चोपडे यांच्या समक्ष करण्यात आले. खंडाळा गावातील सर्व पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करतांना सरपंच
विठ्ठल महल्ले , जि .प . शाळेचे मु.अ. एम.एम. खुने शाळा व्यवस्थापना समीती अध्यक्ष
प्रेमानंद मगर, ग्राम पंचायत कर्मचारी मनोज पाटील उपस्थित होते.