पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड, दि.2: कन्नड शहरात केवळ स्वच्छते अभावी चिकनगुन्या, डेंग्यू साथरोगाने थैमान घातले आहे. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने डासनिर्मूलन करण्यासाठी जे अभियान राबविण्यात येत आहे त्याचा आदर्श नगरपालिकेनेही घेण्यासारखा आहे असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नँशनल कमिटी,दिल्लीचे उपाध्यक्ष ईंजि. मिलिंदभाई लक्ष्मीकांत पाटील यांनी(सोमवार, दि.2) केले.कन्नड शहरात चिकनगुन्या, डेंग्यू साथरोगाचे थैमान सुरू आहे. कोरोना पाठोपाठ या आजारामुळे जनता हवालदिल झालेली असताना राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने चिकनगुन्या निर्मूलनासाठी तिस युवक व टँकर पथकाद्वारे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन ईंजि. मिलिंदभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छते अभावी सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.नियमित स्वच्छता व दक्षता घेतली तर कन्नड शहरात साथरोग पसरणार नाहीत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव यांनी जे नगरपालिकेने करणे अपेक्षित होते ते करुन दाखवले आहे. जनतेने अशा उपक्रमास पाठबळ देण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे गटनेते संतोष कोल्हे यांनी नगरपालिकेच्या वतीने डॉ. सीताराम जाधव,ईंजि. मिलिंदभाई पाटील ,राजानंद सुरडकर यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला.प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शेखर मगर,ऋग्वेद पाटील, प्रशांत अवसरमोल,डॉ. मुकुंद सोमवंशी उपस्थित होते.
तिस युवकांचे पथक व टँकरद्वारे डासप्रतिबंधक औषध फवारणी विविध प्रभागात करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक डॉ. सीताराम जाधव यांनी केले. यावेळी पत्रकार सहयोग जावळे, श्रीकृष्ण बडग यांनी चिकनगुन्या आजाराबद्दलचे अनुभव सांगितले.
या प्रसंगी माजी. नगरसेवक सुनील पवार, किरण राठोड, अनील सिरसाठ,कडूबा पवार, चंद्रकांत लाडे,अनिता लाडे, कनिष्कं जाधव,आकाश बोलधने, शिवराज तेली,विलास राठोड, अशोक भोसले,विठ्ठल राठोड,विलास देवी राठोड, दत्ता न्हाळदे,काशिनाथ जाधव, लोकेश कनोजे,बंटी काशिनंद, नगरसेवक युवराज बनकर,रफीक पठाण आदिंची उपस्थिती होती.