गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड जवळील वान धरण त्रिवेणी संगम असे आहे .या हनुमान सागर वान धरणामध्ये सततच्या आलेल्या पावसामुळे वान धरणाची झपाट्याने पाण्याची पातडी वाढली आहे. ८४खेळी लगत असलेला पाणीपुरवठा असलेल्या धरणामध्ये आणखी पातळी वाढल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार असून आणखीन सततच्या पावसामुळे वान धरणाची पातळी पुन्हा अधिक वाढण्याची शक्यता आहे सकाळी सात वाजता दिनांक २३/०७/२१ रोजी ३७.१४% टक्के धरणाची पाणी पातळी उपलब्ध आहे. वान धरणांमधील पाणी पुरवठा अकोला सह बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावांना सुद्धा मिळते. वान धरण हे हनुमान सागर म्हणून प्रसिद्ध आहे. वान धरणाची पातळी वाढल्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. सतत पाऊस पडून वान धरणाची पाणी पातळी आणखी वाढली पाहिजे अशी मनोकामना अनेक गावातील लोकं वान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी करीत आहेत.