स्वच्छंदी ! कधीही न संपणारी
अविनाश पोहरे / चिफ ब्युरो,अकोला
अकोला जिल्हा एक ऐतिहासिक शहर,निसर्गाचा वारसा लाभलेलं शहर , निसर्गाच्या हिरवळ शालीत वसलेलं पातुर ( नानासाहेब) करुया तालुक्याची भटकंती !!
प्रत्येकाला वाटतं मला माझ्या मनासारखं जगायचं आहे”. पण नेमक कस? या प्रश्नाचं उत्तर कधी कधी सगळं करून देखील अनुत्तरीतच राहत. आपण एखादी कृती का केली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर शोधली कि सगळं शक्य आहे अस मला वाटतं.
थोडक्यात काय – आवड असेल तर सवड मिळते. ‘मला फिरायच आहे जगात आलो आहे तर हे जग बघूनचं जाईल’ असं ठरवलं आहे. म्हणूनच मी फिरायचं ठरवलंय . मला आवडतात हे स्वछंदी प्रवासानुभव ! कधी न संपणारे ! ते देखील माझ्या मित्रांसोबत कुटुंबासोबत……या धावपळीच्या जिवनातं फिरणं सर्वांसाठी खूप आव्हात्मक आहे खरं …..पण शिस्त,कुतूहलं आणि आवड यांचे समीकरण नीट जुळून आलं कि जमतंय बघा सगळं.आणी सोबतचं मला डायरी लिहायची असुन यामधे माझा प्रवास आणि प्रवासातील बरे वाईट अनुभव मी डायरीत लिहीवे असा विचारं आहे म्हणजे लिहून झाल्यावरं आठवणीतं रहावे.आणी जरं माझं लिखाण वाचलं गेलं तर हे अनुभव या डायरीच्या किंवा ईतर माध्यमातून आपणासोबत शेअर करुन मला पणं उस्फुर्त झाल्यासारखं वाटेलं ……चलां तर मग……
स्वच्छंदी! न संपणारी भटकंती !! या माझ्या आवडीची सुरुवात झाली. 2020पासून मी ही डायरी लिहिणार आहे आणि माझ्या बंद डायरीतील प्रवासानुभव अनेक वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीलं. माझे लिखाण आणि त्यातील माहिती आपणं मित्रांकरिता शेअर करतं आहे. जेणे करून आपणास फिरणे सोईस्कर होईल .
2020 ला सुरुवातं झाली हे वर्ष घेऊनं आलं नविन काही जसे की COVID-19 आणी मगं टाळेबंदी बाहेर जाण्यास प्रवास बंदी मग आम्ही निवडले अगदी जवळचं ठिकाणं धोदानी गांव….. तसं एक छोटसं खेड म्हणजे पातुर तालुक्यातील आणी जिथे जन्माला आलो,जिथे आपलं आयुष्य जाणार आहे त्या गावाची तालुक्याची येथीलं मातीची ,निसगवैभवाची ओळख,त्याचा इतिहास यांची ओळख आपल्या भावी पिढीला करून देणं हेही आपलं कर्तव्यंच आहे असं मला वाटत…..म्हणुन निवडलं
धोदानी गावं……… लहानसं खेडं- झाडांनी दाटलेलं, झुळझुळ झऱ्यांनी गाणारं, अनेक पक्ष्यांच्या कंठातून किलबिल गाणारं नयनरम्य ठिकाणं
श्रावण महिना लागला असुन पातुर तालुका हिरवळिने नटला आहे हिचं हिरवळं प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालते याचं शोधातं आमचं कस झालं होत काखेत कळसा अनं गावालां वळसां….कारण आमच्या एकदम जवळं असलेलं हे नयनरम्य ठिकाणं सोडुन आम्ही ईतरत्र त्याचाशोध घेत होतो असो ठरल्याप्रमाणे पातुरवरुनं अवघ्या चाळीस मिनिटातं आम्ही नियोजित धोदानी गांव गाठलं पुढे हाकेच्या अंतरावरं असणार्या धबधब्याच्या आवाजाने आमची ऊत्कंठा शिगेला पोहचतं होती आणी काही क्षणातंच आमच्या डोळ्यांसमोर होता मनमोहकं नजारा…..खरचं अप्रतिम
नयनरम्य नजारासोबत थोडावेळ फोटोशुट करुनआम्ही मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला व ठरल्याप्रमाणे वेळेतं वनभोजनाचा बेत यशस्वी करीत मनमुराद वनभोजनाचा आस्वाद घेतं थोडी विश्रांती घेऊन पुढीलं प्रवास सुरु झाला येथील रानवाटांनी फिरतांना येथीलं वातावरण मनाला आल्हाददायक वाटतं वाटेतुनं चालतांना वनातं चरणारी गुरेढोरे तरं कुठे शेतातं राबणारा शेतकरी राजां मन वेधुन घेतो.कुठे पक्षांचा किलबीलाटं तर कुठे नदी नाल्यांतुन पाण्याचा खळखळाटं मनाला भावुन जातो या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेत या नैसर्गिक वातावरणात भटकंती करत तीन चार टेकड्या आणी नदी पात्र नाले सर करून वाटेतं भेटेलं त्यांना रस्ता विचारतं आम्ही आमचं ठरलेलं ठिकाणं म्हणजेचं श्री जमालं बाबा मंदीर व जमाल बाबांची खिंड हे ध्येय गाठलं.भल्या मोठ्या डोंगराच्या मधोमध ही खिंड असुन अशी आख्यायिका आहे कीं याचं खिंडमधे श्री जमाल बाबा आत गेले व नंतर ते कधी परतलेचं नाहीतं तद्नंतर पातुर येथील श्री पांडुंरंग महाराज सुद्धाया खिंडमध्ये गेले पणं त्यांचेसोबत सुद्धा हेच घडले.त्या दिवसापासुन आजपावेतो कुणी परत या खिंडीत जाण्याची हिंमत केली नसुन पांडुरंग महाराज यांचे वंशज आजही येथील पुजाविधी अविरत करत आहेत.डोंगरांच्या कुशीत लपलेल्या याचं खिंडीच्या टेकडीवर श्री जमालं बाबा श्री मुंगसाजी महाराज श्री भोलेनाथ श्री दत्तात्रय महाराज श्री विठ्ठल रुख्मिनी मंदीरांची स्थापना करणायात आली असुन एखाद्या टुमदार रिसॉर्टला लाजवेलं असं येथील वातावरणं आहे . शक्य झाल्यास आपणही येथे अवश्य भेट द्यावी. आणी हो या ठिकाणी आपण आपल्या वाहनाने सुद्धा जाऊ शकता यकरिता आपणास मालेगावं ते पांगराबंदी या रस्ताने मारसुळ या गावातुन जाता येईलं.चलां तर मग ठरवां कधी जायचं………….
या भटकंतीत माझे मित्र अंकुश,नंदन,विजय,राजु आणि माझा मित्र गणेश यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे.
पुढिल भटकंतीत सोबत माझे आणखी मित्रं आणी वाचक आणि शुभचिंतक देखील असतिलचं !
तर मित्रांनो आणि खास करून वाचकांनो फिरुया आणि भावी पिढीला गावांकडिल सौंदर्य दाखवुया.
नाव : प्रभुदास नि.बोंबटकर
(मु.पो.पातूर,जिल्हा अकोला)