सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
परंपरा आणि शासनधोरण यांत समन्वय असावा. कोरोनाची आपत्ती ओढवली, हे खरं आहे. मात्र पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा प्राणवायू आहे. सात-आठशे वर्षांची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी सरकारला मार्ग काढता आला असता. सर्व व्यापार-व्यवहार एकीकडे सुरळीत होत असताना केवळ वारीवर कठोर निर्बंध लादणे, हा भावनेशी खेळ असल्याची वारकऱ्यांची भावना आहे. नोंदणीकृत दिंड्यांच्या प्रतिनिधींना जर नियम पाळून वारीची परवानगी दिली तर परंपरेत खंड पडणार नाही.
गोपाल महाराज पितळे (मेहकर)
राज्य पदाधिकारी, वारकरी महामंडळ