तळोधी बाळापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (१० जुलै)- राज्यातील वन विभाग वन्य प्राण्यांचे संरक्षण करून जनतेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असून वनविभाग जीवनाशयक साधन गरजा पूर्ण करीत असल्या तरी जंगलात जाणे गरजेचे आहे कारण अनेकांना शेती व्यवसाय,गुरेढोरे चराई करायचा असतो .तेव्हा प्रत्येक गावात 4 व्यक्तीची टीम तयार करण्यात आली असून त्या टीमचे मार्गदर्शन मधून नागरिकांनी पालन करावे.हा प्रसंग दुःखा चा असून वाघाच्या हल्ल्यात झालेल्या कुटुंबियांनी वन विभागाने दिलेल्या आर्थिक मदतीचा लाभ योग्य पद्धतीने करण्याचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सांगितले. नुकताच तळोधी बाळापूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या आकापूर येथील खटूजी कुमरे तर धामणगाव येथील पांडुरंग खोब्रागडे या इसमाचा वाघांच्या हल्ल्यात ठार झाले होते. तेव्हा वनविभागाच्या माध्यमातून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते शिलाबाई खटूजी कुमरे ला 4 लक्ष 80 हजार व हरेंद्र पांडुरंग खोब्रागडे यांना 4 लक्ष 85 हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तळोधी( बाळापूर) येथील वन विभाग कार्यालयात आर्थिक मदत धनादेश देत असताना भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर , आरएफओ के आर धोंडणे ,नागभीड चे नप नगराध्यक्ष उमाजी हिरे भाजप जिल्हा सचिव राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके, नप उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, नप सभापती सचिन आकुलवार कृउबास सभापती आवेश पठाण, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष इंदूताई आंबोरकर ,सोनू नूराणी भास्कर लोंनबले नरेंद्र खोब्रागडे धनराज बावनकार रमेश बोरकर आदी उपस्थित होते.