महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.४:- भद्रावती शहरातील स्थानिक भवानी माता मंदिरासमोर नेहमी भिक्षा मागण्यासाठी बसत असलेल्या सरस्वती कांबळे यांचा दि. ४ जुलै ला रात्री १ .४५ सुमारास आजाराने मृत्यू झाला.या नेहमी भवानी माता मंदिर समोर भिक्षा मागत असायच्या काही महिन्यापूर्वी त्या आजारी पडल्या होत्या त्यावेळी याच युवा मित्रांनी तिला रुग्णालयात दाखल करून तिचा प्राण वाचविला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तिला अति आजार झाल्याने तिचा मृत्यू झाला.ती अनाथ असल्याने तिचा अंत्यसंस्कार कोण करणार याकडे कुणाचेही लक्ष नव्हते मात्र या घटनेची माहिती पडताच या मित्र परिवारातील मित्रमंडळींना तिच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण मित्रांनी ती मयत पडलेल्या नाग मंदिर च्या साईडला स्मारक च्या समोर मृतदेह पडलेल्या जागेवर जाऊन तिला फूल आहाराने सजवून बँडच्या माध्यमातून तिरडी सजवून तिचा अंत्यसंस्कार जैन मंदिर मागील स्मशानभूमीत अतिशय आदराने केला. यावेळी नितेश बानोत, जयंत बेरड, अमनसिग राजपूत, रोहित स्वान,भूषण पारखी, ऋषिकेश नदीनरु, आतिश डोंगरे, जीवन सैताने, अभी आवारी, राहुल पेचने, सागर पढाल, सूरज शेटी, अजित अवताडे, अनिकेत चापले, स्वप्निल बुच्चे आदी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)