गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
अकोला जिल्हाचे पालकमंत्री तथा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा आज वाढदिवस त्यामुळे बच्चु कडू ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी पालकमंत्री महोदय यांच्या निवासस्थानी जाऊन बच्चू कडू यांना शुभेच्छा देत प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे असे फोटो सोशल मिडिया वर कार्यकर्त्यांन कडून व्हायरल होत आहेत
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-05-at-5.27.00-PM.jpeg?resize=940%2C594&ssl=1)
त्यामुळे आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची लगबग सुरू आहे अश्यातच तेल्हारा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार हे मात्र आता निश्चित झाले आहे कारण 2019 च्या निवडणूक पूर्वी अनिल गावंडे यांनी शिवसेनेचे शिवबंधन आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्या सह बांधून घेतले होते व 2019 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती मात्र निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने शेवटी अपक्ष लढून प्रचंड बहुमत घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहलेले अनिल गावंडे हे चर्चेचा विषय ठरले होते त्यामुळे आता मात्र त्यांच्या ह्या भेटीमुळे अनेकांना धुडकी भरली आहे अशी अवस्था झाली आहे कारण तुषार पुंडकर सुद्धा विधानसभा निवडणुकीत क्रमांक 3 ची मते घेऊन प्रहार चे नाव कोरले होते व बच्चू कडु यांचे विश्वास संपादन केले होते मात्र त्यांच्या अचानक गेल्याने प्रहार ला मोठा फटका बसला होता त्यांनतर विधानसभा दृष्टीने एखादा अभ्यासू कणखर नेतृत्व हे प्रहार ला महत्वाचे होते मात्र नव्या उमेदीने असा कुणीही कार्यकर्ता पुढे दिसला आहे किंवा समोर सुद्धा आला नाही त्यामुळे आता अनिल गावंडे च्या रूपाने ते प्रहार मिळाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्यामुळे आता स्थानिक पातळीवर अकोट विधानसभा मतदारसंघात गटबाजी च्या राजकारणा विराम मिळतो का की नविन समीकरणे पहावयास मिळतील हे येणारी वेळच सांगू शकले हे मात्र खरे
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)